राज्यातील लाखो डीएड, बीएड धारकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे. मागील दहा वर्षांपासून ही शिक्षक भरती प्रलंबित आहे. राज्यातील जवळपास 1 लाख 78 हजार उमेदवार भरतीच्या प्रतिक्षेत आहेत.
35 हजाराहून अधिक जागा रिक्त आहेत. 70 टक्के शिक्षक भरती स्थानिक स्वराज्य संस्थेत होणार असून ग्रामीण भागातील उमेदवारांना या भरतीचा सर्वाधिक लाभ होणार आहे.